मुंबई – जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी थेट पंतप्रधान मोदींच नाव घेत काही माहिती सर्वांसमोर आणली. तसेच पुलवामा आपल्या चुकीमुळे झालं असल्याचं पंतप्रधानांना सांगितलं असा खळबळजनक दावाही मलिक यांनी यावेळी केला. मलिक यांच्या दाव्यानंतर आता राजकरण चांगलाच तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आता या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
राऊत म्हणाले,”हा मोठा गौप्यस्फोट नाही. ही गोष्ट देशाला आधीच माहिती होती की पुलवामा हल्ल्यात काहीतरी घोटाळा आहे. यात तेव्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणारे तेव्हाचे सत्ताधारी निवडणुका जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करतील असं म्हटलं जात होतं असं स्पष्ट मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच तीनशे किलो आरडीएक्स तिथं कास पोहचल ? सरकराने जवानांना विमान का दिल नाही ? असं घडवून निवडणूका जिंकायच्या होत्या का ? हे प्रश्न तेव्हासुद्धा विवधकांनी विचहराले परंतु असे प्रश्न विचाणाऱ्यांना राष्ट्रद्रोही देशद्रोही म्हणून गप्प करण्यात आलं असंही राऊत यावेळी म्हणाले.
माध्यमांशी बोलताना राऊत यांना मलिक यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. आज त्यांनीच नेमलेला राज्यपाल मलिक यांनी हे स्फोटक सत्य समोर आणलं आहे जे की पुलवामाच्या स्फोटापेक्षा भयंकर आहे. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे. यासाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांचं कोर्टमार्शल व्हायला पाहिजे अशीही मागणी यावेळी खासदार संजय राऊत यांनी केली.
काय म्हणाले सत्यपाल मलिक नेमकं
सत्यपाल मलिक म्हणाले की, “पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. पण गृह मंत्रालयाने त्यांना विमानं दिली नाहीत. होम मिनिस्ट्रीने त्यांना एअरक्राफ्ट दिल नाही मला विचारलं असत तर मी दिल असत. पाच एअरक्राफ्टची गरज होती. त्याच संध्याकाळी मी पंतप्रधानांना सांगितलं की हे आपल्या चुकीमुळे झालं आहे ते म्हणाले तुम्ही आता शांत बसा. असा गौप्यस्फोट मलिक यांनी यावेळी केला.