– माधव विद्वांस
भारतीय गणितज्ज्ञ, वस्तुनिष्ठ इतिहासाचे अभ्यासक व भारतीय इतिहासलेखनास योग्य दिशा दाखविणारे, दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा आज स्मृतिदिन (निधन 29 जून 1966). त्यांचा जन्म 31 जुलै 1907 रोजी गोव्यातील कोसबेन येथे झाला. बौद्ध तत्त्वज्ञान व पाली भाषा तज्ज्ञ धर्मानंद दामोदर कोसंबी यांचे ते पुत्र.
पुण्यात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते वडिलांसोबत अमेरिकेला गेले. कोसंबी यांनी अमेरिकेतील केंब्रिज हाय अँड लॅटिन स्कूल या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. इतिहास पाहताना तसेच अभ्यास करताना राजेराजवाडे व सनावळ्या यांना विशेष महत्त्व न देता त्यावेळचे सामाजिक व आर्थिक जीवन कसे होते याला महत्त्व असावे, असे त्यांचे म्हणणे होत.
हार्वर्ड विद्यापीठातून सन 1929मध्ये गणितातील पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली. हार्वर्डमध्ये असतानाच ते प्रसिद्ध गणितज्ज्ञ जॉर्ज बर्कऑफ आणि नॉर्बर्ट विनर यांच्या संपर्कात आले. शिकागो विद्यापीठात भूमितीचे अभ्यागत प्राध्यापक या नात्याने प्रदिश विश्लेषणसंबंधीच्या अभ्यासक्रमात सन 1949मध्ये त्यांनी 36 व्याख्याने दिली.
1930 ते 1966 या काळात त्यांनी गणित आणि सांख्यिकी या विषयांवर सुमारे साठ शोधनिबंध लिहिले. त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन आणि शिकागो विद्यापीठे येथे सन 1948-1949मध्ये भेट दिली होती. त्यावेळी सापेक्षतावादाच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या प्रदिश विश्लेषण (ढशपीीे) आणि पथ भूमिती (झरींह शोशीीूं) या शाखांमध्ये त्यांचे संशोधन असल्याने त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात आइन्स्टाइन यांच्याशीही प्रदीर्घ चर्चा केली होती.
अमेरिकेत असताना त्यांना फाय बीटा काप्पा सोसायटीचे सदस्यत्व हा बहुमानही प्राप्त झाला. यांनी ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन, इटालियन या युरोपिय भाषा आत्मसात केल्या होत्या. त्यामुळे इटालियन, फ्रेंच आणि जर्मन भाषांमधूनही त्यांनी शोधनिबंध लिहिले. त्यांना वर्ष 1934 मध्ये मद्रास विद्यापीठाचे पहिले रामानुजन स्मृती पारितोषिक मिळाले.
त्यांनी नाणकशास्त्राचा अभ्यास करताना शुद्ध गणित आणि सांख्यिकी याव्यतिरिक्त सांख्यिकी पद्धतीचा उपयोग केला. त्यांनी त्या पद्धतीनं 12 हजार नाण्यांचं वजन केलं होतं. त्यापैकी 7 हजार नाणी ही आधुनिक होती. वर्ष 1929 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात व त्यानंतर अलीगढ मुस्लीम विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले.
1932 मध्ये ते पुण्याच्या फर्गसन कॉलेजमध्ये रुजू झाले. फर्गसनमध्ये त्यांनी वर्ष 1946 पर्यंत नोकरी केली. त्यानंतर ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या गणित विभागाचे प्रमुख बनले. वर्ष 1962 पर्यंत ते या पदावर होते. या संस्थेमुळेच त्यांच्याच तोडीच्या जगभरातल्या तत्त्वज्ञ आणि अभ्यासकांच्या ते संपर्कात आले.
भारतात धरणं बांधण्यासाठी जागा कोणती निवडावी यासाठी कोणतीही वैज्ञानिक पद्धत अस्तित्वात नव्हती. संख्याशास्त्रावर आधारित पद्धतीनं जागा निवडण्यात यावी यासाठी त्यांनी आग्रह धरला. खर्चिक गोष्टी टाळून भारतातील तत्कालीन आर्थिकस्थितीचा विचार करावा, हे सांगताना त्यावेळी प्रस्तावित नाणेघाटात रोपवे ऐवजी सर्व ऋतूंमध्ये उपयोगी येईल असा रस्ता बांधण्यात यावा, असे सुचविले होते.