नवी दिल्ली – देशात अल्पसंख्य, बहुसंख्य असा निरर्थक वाद घालण्यात काही अर्थ नाही. देशातील प्रत्येकालाच घटनेने समान अधिकार दिले असल्याने येथे या विषयावरील वादाला काही अर्थ उरलेला नाही असे केरळचे राज्यपाल महंमद आरीपखान यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत एका परिसंवादात बोलत होते.
ते म्हणाले की, गेले अनेक दिवस हा मुद्दा मी उपस्थित करीत आहे. धार्मिक आधारावरील अल्पसंख्याच्या हक्काचा उल्लेख घटनेतही नाही. आपल्या संस्कृतीत भेदभावाला थारा नाही असेही त्यांनी नमूद केले.
मी स्वताला भारताचा नागरीक समजतो आणि मला अन्य लोकांबरोबरच समान अधिकार आहेत ही बाब अन्यही अल्पसंख्याकांनी मान्य केली पाहिजे. धर्माच्या व्याख्येनुसार भारताची घटना लिहिली गेलेली नाही ही बाबही ध्यानात घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.