पाटणा – बिहार विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर ठेपल्या आहेत. देशातील कोरोना संकट गडद होत चाललं असलं तरी आगामी निवडणुकांसाठी बिहारमधील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाल्याचंही पाहायला मिळतंय. अशातच आज बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमधील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री नितेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
तेजस्वी यादव यांनी याबाबत बोलताना, “४६ टक्के बेरोजगारांसह बिहार हे बेरोजगारीच्या दराबाबत देशातील एक अव्वल राज्य आहे. बिहारच्या विविध सरकारी विभागांमध्ये ४.५ लाख पदे रिक्त आहेत. राज्यातील जनतेने यंदा आम्हाला संधी दिल्यास आम्ही रिक्त पदे भरून लोकसंख्येच्या गुणोत्तरात नवीन पदांची निर्मिती करू.” असं आश्वासन दिल.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी, हत्या करण्यात आलेल्या दलित व आदिवासी जनतेच्या नातेवाईकांना सरकारी नौकरी देण्याच्या नितीश कुमार सरकारच्या निर्णयावरही ताशेरे ओढले. या निर्णयामुळे दलित, आदिवासी समाजाच्या लोकांची हत्या करण्यास प्रोत्साहन मिळेल असंही ते म्हणाले.
“निवडणुका जवळ आल्यानेच नितीश कुमार यांनी, हत्या झालेल्या दलित व आदिवासी समाजातील लोकांच्या नातेवाईकांना नौकरी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इतर मागास वर्ग व खुल्या प्रवर्गातील हत्या झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना नौकरी का नाही? या निर्णयामुळे दलित व आदिवासी समाजातील लोकांची हत्या करण्यास प्रोत्साहन मिळेल.” असा आरोप यादव यांनी केला.
Bihar’s unemployment rate is around 46%, one of the highest in India. Around 4.5 lakh posts are vacant in different departments of state govt. If given a chance, our govt will fill all the vacant posts & create new vacancies in proportion to population: RJD leader Tejashwi Yadav https://t.co/zBdJecgntY
— ANI (@ANI) September 5, 2020