लखनौ, – कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीने आदिवासींच्या मुद्दयावरून नक्राश्रु ढाळणे बंद करावे, असे बह्जन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सुनावले आहे. सोनभद्र प्रकरणातील पीडीतांच्या मतानुसार पहिले भूमाफिया कॉंग्रेस आणि सपा आहे. या पक्षांनीच आदिवासींची जमीन बळकावली आहे. त्यानंतर अनेक आदिवासी मारले गेले आहेत, असे मायावती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
नक्राश्रु ढळण्यपेक्षा सपा आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी आदिवासींना जमिनी परत द्याव्यात. तरच त्यांची काळजी योग्य समजली जाऊ शकेल, असे मायावती म्हणाल्या. गेल्या महिन्यात 17 तारखेला जमिनीच्या मालकीच्या मुद्दयावरून झालेल्या गोळीबारामध्ये 10 गोंड आदिवसी मारले गेले होते. त्या उंभा गावाला कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नुकतीच भेट दिली आणि पीडीतांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभुमीवर मायावती यांनी सपा आणि कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशातील भाजप सरकरने या संदर्भात कठोर कारवई करायला हवी आणि आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळवून द्यायला हव्यात, अशी मागणीही मायावती यांनी केली. प्रियांका गांधी यांनी यापूर्वी पीडीत कुटुंबांची भेट घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. संवेदनशील प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाने त्यांना पीडीतांच्या घरी जाण्यापासून रोखले होते.