Manoj jarange patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (maratha reservation) आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मराठा समाजाच्या गाठी-भेटी दौरे सुरु करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला 15 नोव्हेंबरपासून म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा तिसरा टप्पा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी गावातुन सुरु आहे. त्यासाठी उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार पहिली सभा पार पडणार आहे. वांगी येथे 100 एकर जागेवर ही भव्य सभा होणार असून या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, यापूर्वी सकल मराठा समाजाची मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगे यांची नेता म्हणून मराठा समाजाने निवड केली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी ‘आमच्या समाजासाठी 75 वर्षात कोणी काय केले हे समजासमोर मांडणार असल्याचा इशाराच दिला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे.
जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर मराठा आरक्षणासंदर्भात वेळ दिला आहे. मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडून काढला असं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. सर्व जिल्ह्यात नोंदी सापडत आहे. आतापर्यंत 35 ते 40 टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे समाधान असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
समाजाचे सेवक म्हणून समाजाची सेवा करणार, सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार, 50 टक्क्याच्या आत लोकसंख्येनुसार आरक्षण मिळणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.