Manoj Jarange patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पूर्णपणे राजकीय नेते विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे मराठा तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. त्याला आता मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे. मराठ्यांचे कोण नुकसान करत आहे त्या नेत्यांची नावे लवकरच उजागर करू असा इशारा देत नावे जाहीर करण्याची तारीख देखील त्यांनी यावेळी सांगितली.
विजय वड्डेटीवारांच्या आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी, ‘तुम्ही कुणासाठी काम करता हे आम्हाला आता कळलं असून तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, वेळोवेळी वेगवगेळी वक्तव्य करून तुम्ही सरड्यासारखे रंग बदलत आहात. तुमच्यासारखा विरोधी पक्ष देशात कुणी नाही, तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी असून मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, असे आरोप करत येत्या 24 डिसेंबरला मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या सहा जणांची नावेही सांगतो असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवार यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. “आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात. पण आमची मुलं दूधखुळी नाहीत, मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, आता तुमच्या सल्ल्याची सुद्धा गरज नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी वड्डेट्टीवार यांना सुनावले आहे.
त्यासोबतच “अशा लोकांना गोरगरीब आठवत नाही. मात्र आता हे कुणासाठी काम करता हे कळलं आहे. कधी काय तर कधी काय? तुम्ही सरड्यासारखे रंग बदलत आहात. तुमच्यासारखा विरोधी पक्ष देशात कुणी नाही. मुळात यांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी आहे. हा मनोज जरांगे राजकारणासाठी करतो, असे एकही मराठा ओबीसी म्हणू शकत नाही. तुम्हाला मराठा समाजशिवाय माया नाही, आम्हाला तुम्ही सांगू नका, काय करायचं, अभ्यास करायचा की नाही, आमच्या मुलांच्या बुद्धी ठेप्यावर आहे, आमच्या मुलांना तुम्ही सांगायची गरज नाही. तुमच्यासारख्या लोकांनीच आम्हाला संपवलं आहे. आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत, पण हे होऊ देणार नाही, असा कडक इशाराच त्यांनी यावेळी दिला. ..
दरम्यान, मनोज जरांगे यांनी, तुम्ही काय चीज आहे, हे आम्हाला आता कळले, तुम्ही 5 ते 6 जण काय नमुने आहेत, हे आम्हाला कळलं. त्यामुळे तुम्ही आता आमचे मराठ्यांचे शत्रू झालात. आता कुणबी नोंदीचे पुरावे मिळू लागले म्हणून काहीही बोलू लागले आहेत. मात्र थोडं थांबा, मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले शिकवतील, असे ते म्हणाले. शिवाय विजय वड्डेट्टीवर यांच्यावर निशाणा साधत ‘असला विरोधी पक्ष नेता असतो का? असले विचार करून तुमचा पक्ष कसा राहील, राहुल गांधीने हेच शिकवलं का तुम्हाला असा सवाल करत मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या त्या 6 जणांचे नाव 24 तारखेला सांगतो, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर राजकीय नेत्यांना घाम फोडला आहे.