Manoj Jarange maratha Reservation : दिलेल्या आरक्षणाचे आम्ही स्वागत केले, मात्र मराठ्यांची ही मागणीच नाही. मी हटू शकत नाही. उद्या बैठक घेऊन राज्यभरात आंदोलनाची दिशा ठरणार आहे.आजवर मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवलाय. कोणाच्या तरी दडपणाखाली त्यांनी निर्णय घेतलाय. त्यांच्यावर विश्वास ठेवून ६ महिने वेळ दिलाय. ते कसे अंमलबजावणी करत नाही तेच बघतो, असे आव्हान मराठा आरक्षणासाठी अंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी मंगळवारी दिले.
जरांगे पुढे म्हणाले की, आमचे एवढंच म्हणणे आहे की,अंमलबजावणीचा विषय गांभीर्याने घ्यायला हवा होता. तुम्ही गोरगरीब मराठ्यांची चेष्टा करू लागलेत. आंदोलनाचा शेवट सांगायचा नसतो. आम्ही आजच्या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे, पण करोडो लोकांच्या मागणीला प्राधान्य दिले पाहिजे, असेही जरांगे म्हणाले. | Manoj Jarange maratha Reservation
जरांगे काय म्हणाले?
सगेसोयरे अध्यादेशच्या अंमलबजावणीपर्यंत उपचार घेणार नाही
मी हटू शकत नाही; उद्या बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरणार
आजवर मुख्यमंत्र्यांवर आम्ही विश्वास ठेवला; ते दडपणाखाली निर्णय घेतायेत
आंदोलनाचा शेवट सांगायचा नसतो
सरकारचे सलाईन का घ्यायचे? उपचार बंद करणार
कायदा समतीनंतर CM शिंदे म्हणाले..
आजचा दिवस कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. ना कोणावर अन्याय, ना कोणाला धक्का असा निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री असलो तरी मी कोणतीही आडकाठी न आणता आंदोलकांना भेटलो.एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडला आहे.शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही तो मागे लोटला जातोय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून द्यायचे हा निर्धार आम्ही केला होता. असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. | Manoj Jarange maratha Reservation