नवी दिल्ली – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज प्रदीर्घ काळानंतर केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मनमोहन सिंग म्हणाले की, कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि वाढती महागाई यामुळे जनता हैराण झाली आहे. 7.5 वर्षे सरकार चालवल्यानंतर, आपली चूक मान्य करण्याऐवजी आणि सुधारणा करण्याऐवजी, सरकार देशाचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहे.
पुढे बोलताना मनमोहन सिंग यांनी, या सरकारचा खोटारडे राष्ट्रवाद जितका पोकळ आहे तितकाच घातकही आहे. त्यांचा राष्ट्रवाद ब्रिटिशांच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणावर आधारित आहे. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. हे सरकार परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही पूर्णपणे अपयशी ठरले आहे. असा आरोप लगावला.