नवी दिल्ली – मणिपूरमधील शवागारात पडलेल्या मृतदेहांवर (Dead bodies after violence) अत्यंसंस्कार करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मणिपुर सरकारला केली आहे. मणिपुरातील हिंसाचारात ठार झालेल्या अनेकांचे मृतदेह अद्याप शवागारात पडून आहेत त्यावर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. (Manipur government)
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D Y Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नमूद केले की, न्यायमूर्ती (निवृत्त) गीता मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या माजी महिला न्यायाधीशांच्या समितीने दाखल केलेल्या अहवालात शवागारात पडलेल्या मृतदेहांची स्थिती दर्शविली आहे. अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की १७५ पैकी १६९ मृतदेहांची ओळख पटली आहे तर सहा जणांची ओळख पटलेली नाही.त्यात नमूद करण्यात आले आहे की ओळखल्या गेलेल्या मृतदेहांपैकी ८१ मृतदेहांवर नातेवाईकांनी दावा केला आहे तर ८८ मृतदेहांवर दावा करण्यात आलेला नाही. (MANIPUR news)
खंडपीठाने नमूद केले की राज्य सरकारने नऊ ठिकाणे ओळखली आहेत जिथे दफन किंवा अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात.ज्यांची ओळख पटली नाही किंवा ज्या मृतदेहांवर दावा केला गेला नाही अशा मृतदेहांना शवागारात ठेवणे योग्य होणार नाही,असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
ज्यांचे मृतदेह नातेवाईकांनी ओळखले आहेत ते मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या त्वरीत ताब्यात दिले जावेत, अशी सूचनाही कोर्टाने केली आहे. हे काम ४ डिसेंबर किंवा त्यापुर्वी करावे असेही कोर्टाने सुचवले आहे. प्रत्येक मृतदेहांचे डीएनए नमुने घ्यावेत आणि ते जपून ठेवावेत असेही न्यायालयाने म्हटल आहे.