नगर – करोना महामारीने सर्वत्रच थैमान घातलेले आहे. शैक्षणिक क्षेत्र सोडून इतर सर्व बाबींवर सरकार, केंद्रसरकार ठाम निर्णय घेत आहे. परंतु कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळ यावर्षी विद्यापीठाचे अंतिम वर्षाची परिक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. कारण विद्यापीठ अथवा सरकार यामध्ये कोणत्याही प्रकारे एकमत झालेले दिसत नसून अंतिम वर्षाच्या पदवी परिक्षेबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन नगर येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उप केंद्र येथे देण्यात आले. यावेळी अजित कोतकर, सुहास साळुंके, रणजीत ठुबे, बंटी विरकर, सागर शिरोळे आदी उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राथमिक, माध्यमिक व विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या गुणवत्तेचा आधार घेऊन पुढील वर्गात प्रवेश देणेबाबत तो निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वगतच आहे.
परंतु सध्या कोविड- 19 चा प्रभाव शहरीभागात अती प्रमाणात असून खेड्या पाड्यामध्ये वाढत चालला आहे. परिणामी जिल्हा हा क्षेत्रफळाने मोठा व खेड्यांची संख्या जास्त असणारा जिल्हा आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी खेड्या-पाड्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येत आहेत.
या निर्णयामुऴे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांना पुढीलल वर्गात प्रवेश देणे बाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा,अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत निवेदन देण्यात आले आहे.