मुंबई :- अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ” भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते.
त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.”
पुढे संजय राऊत यांनी म्हटले आहे की,” महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
पुढे संजय राऊत म्हणतात की,”माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले” मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”. होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.
दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.