आळंदी, (वार्ताहर)- केंद्राचा आम्हाला मोठा निधी आणायचा आहे. येथे वारकरी देशातून राज्यातून येतात. परदेशी लोक भाविक या दिंडीत सहभागी होतात. त्यामुळे या सुविधा मिळाल्या पाहिजेत. राज्य सरकार देत आहे त्याला केंद्राची जोड मिळाली तर आपल्याला अधिक फायदा होणार आहे. अनेक विकासाचे प्रश्न व अडचणी मार्गी लावता येणार आहेत. त्यासाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना आपल्याला पुन्हा संसदेत पाठवायचे आहे, असे असे अजित पवार म्हणाले.
आळंदी येथे शिरूर लोकसभा मतदार संघ महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस या प्रसंगी, आमदार दिलीप मोहिते पाटील, मजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे,
जिल्हाअध्यक्ष भाजपा शरद बुट्टे पाटील, राम गावडे, राजूशेठ मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, आकाश जोशी, नगरसेवक सचिन गिलबिले, किरण येळवंडे, सागर भोसले, डी. डी. भोसले, अजय तापकीर, नगरसेवक पांडुरंग वहिले, राहुल चव्हाण प्रशांत भोसले, गणेश रहाणे, प्रथमेश होले, अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर बनसोडे, संदीप पवार, सचिन काळे व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अजितदादा म्हणाले, महायुती सरकारमध्ये आम्ही काम करत आहे. खेडचे शिल्पकार म्हणून दिलीप मोहिते यांचे नाव घेतो. विशेष प्रयत्नांतून त्यांनी 56 कोटींची विकास कामे आळंदी देवाची या परिसरात केली आहे. अजूनही काही कामे राहिली असली तरी माझी व दिलीपरावांची तयारी आहे. इंद्रायणी प्रदूषण थांबवले पाहिजे. या संदर्भातील इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या निवेदनाबाबत अजित पवारांनी यावेळी माहिती दिली.
आळंदीकरांना पाणी मिळालंच पाहिजे
आळंदी पाणी प्रश्न संदर्भात ते म्हणाले, पाण्याचे प्रश्न आहेत ते येथे मांडण्यात आले. वास्तविक आपल्या येथे धरणं उशाशी आहे. आपण मात्र उपाशी राहिलो आहे. भामा आसखेडचे पाणी माझ्या पिंपरी चिंचवड गेले. माझ्या पुणे शहराला गेले. तो सर्वांचा हक्क आहे. मात्र माझ्या आळंदीकरांचं काय? त्यांनाही पिण्यासाठी पाणी मिळाले पाहिजे.
मी महायुतीमध्ये गेलो. फार मोठी चूक केली नाही. फार विचार पूर्वक निर्णय आम्ही घेतला आहे. कारण स्व. चव्हाण साहेबांनी सांगितले होते सत्ता तुमच्याकडे असेल तर बहुजन समाजाचे, मागासवर्गीय समाजाचे, आदिवासी समाजाचे अल्पसंख्याक, ओबीसीचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता.
सत्ता नसेल तर तुम्हाला फक्त आंदोलन करावी लागतील. मोर्चे काढावे लागतील. उपोषण करावे लागेल. त्यातून फारसे साध्य होईल असा भाग नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील विकासाची कामे करण्याकरता सगळेजण सत्तेत सहभागी झालो आहोत. -अजित पवार, उपमुख्यमंत्री