टाकळी हाजी (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी, वडनेर, जांबूत, फाकटे, चांडोह, पिंपरखेड आदि परिसरामध्ये ऊसक्षेञ मोठ्या प्रमाणात असून दोन्ही बाजूने घोडनदी व कुकडी नदी वाहत असल्याने बिबट्या नेहमीच आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ असतो. त्यामुळे कित्येक दिवसापासून तो या परिसरात तो या परिसरात ठाण मांडून आहे.
बिबट्याने यापुर्वी अनेक धुमाकूळ घालून शेळ्या, मेंढ्या, कुञी प्रसंगी मानवजातीवरही हल्ले केले. यामध्ये काही निरपराध व्यक्तींना आपला जीव देखिल गमवावा लागला.वनविभागाने जांबूत, पिंपरखेड या ठिकाणी अनेक वेळा पिंजरा लावून त्यांना पकडण्यात यशदेखिल मिळवले.परंतु त्याची दहशत राहीली ती कायमचीच.
माळवाडी, उचाळेवस्ती या ठिकाणी तो अनेक वेळा दिवसादर्शन देत असल्याने नागरिक शेतात पिकांना पाणी देण्यासाठी देखिल घाबरत आहे.उचाळेवस्ती येथे ३ते ४ बिबट्यांचे एकाच वेळीच दर्शन झाल्याचे बाबाजी हिलाळ गुरुजी यांनी सांगितले .त्यानंतर राञीअपराञी पिकांना पाणी देण्यासाठी गेल्यावर अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिला असल्याचे त्यांनी सांगितले .
https://www.facebook.com/217046208635092/posts/1209488206057549/
नुकतेच माळवाडी येथे रामदास बाबाजी भाकरे यांच्या शेळीच्या करडावर हल्ला करुन बिबट्या पसार झाला . ज्ञानेश्वर विष्णू रसाळ या मुलावर सायंकाळी ७ वाजता डाळिंब फवारणी करताना बिबट्या दिसला व गुरगूर करत त्याने हल्ला करण्याचा एक प्रकारचा इशाराच दिला. परंतू ट्रक्टरची लाईट जवळच असणाऱ्या कुटूबियांना मदतीची हाक मारल्याने त्याचा तो प्रसंग सुदैवाने टळला.
या परिसरातील ऊसक्षेञ कमी झाले असून डाळिंब क्षेत्र मोठ्या प्रमाणात झाले आहे.बिबट्याला लपण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने तो दिवसादेखिल आपले दर्शन नागरीकांना देत आहे. बिबट्याचे बंदोबस्त करण्यासाठी नागरिक मागणी करत आहेत.