नगर – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु झाल्यापासून अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारुची विक्री करणा-या विरुध्द 140 गुन्हे दाखल केली आहेत. तसचे विभागाने 106 आरोपींना ताब्यात घेवून, त्यांच्याकडून 28 लाख 33 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या काळात अवैद्य दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असते, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने कारवाई केली आहे.
21 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 144 गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. त्यापैकी 110 जनांना ताब्यात घेतले आहे. यागुन्ह्यात देशी दारु 1 हजार 175 लिटर, विदेशी दारु 244 लिटर, बिअर- 55 लिटर, रसायन 27 हजार 860 लिटर, हातभट्टी दारु 1 हजार 411 लिटर, ताडी 1 हजार 496 लिटर, विदेशी 423 लिटर तसेच दुकाची व चार चाकी असे एकून 17 वाहने असा एकूण 28 लाख 23 हजार 830 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक संजय सराफ, ए.बी बनकर, बी.टी घोरतळे, उत्तम बडे, रोहिदास वाजे, अनिल पाटील, दशरथ जगताप यांच्या पथकाने केली.