Kharge on Rajkot Fire । गुजरातमधील राजकोट येथे लागलेल्या भीषण आग दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी तीव्र शोक व्यक्त केलाय. त्यांनी या प्रकरणात जबाबदारी लवकरात लवकर निश्चित केली जावी आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी केली आहे.
राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजकोट शहरातील ‘गेमिंग झोन’मध्ये शनिवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत लहान मुलांसह 27 जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झालेत.
जखमींसाठी प्रार्थना Kharge on Rajkot Fire ।
मल्लिकार्जुन खरगेंनी ट्विटरवर पोस्ट केले, “राजकोट, गुजरातमधील गेमिंग झोनची भीषण शोकांतिका अत्यंत वेदनादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून त्यात अनेक निष्पाप मुलांचा समावेश आहे. आम्ही पीडितांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करतो.
खरगे पुढे म्हणाले की, मी काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती करतो की, अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करावी जेणेकरुन अपघातग्रस्तांना उपचार आणि नुकसान भरपाई इत्यादीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये.
राज्य सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप Kharge on Rajkot Fire ।
गुजरात सरकारच्या हलगर्जीपणामुळे असे अपघात होतच राहतात आणि निष्पापांना जीव गमवावा लागतो, असा आरोप खर्गे यांनी केला. अपघाताची जबाबदारी लवकरात लवकर निश्चित करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.