नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर धोकाधडीचा आरोप केला आहे. केजरीवाल यांनी जनतेला दिलेली कोणतीही आश्वासने आपण पाळली नाहीत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दुसर्याच्या विकासकामांवरच आपले नाव कोरले. मुख्यमंत्र्यांनी धरणे आंदोलनशिवाय कोणतेही काम केले नाही.
अमित शहा यांनी गुरुवारी पूर्व दिल्ली हबची पायाभरणी केली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमास संबोधित करत होते. ते म्हणाले की केजरीवाल मुख्यमंत्री होऊन 60 महिने झाले आहेत, परंतु आजपर्यंत पाणी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का ? केली नाही. ही आश्वासने अजूनही पूर्ण होणार नाहीत. केजरीवाल सरकार फक्त जाहिराती देऊन, लोकांना फसवत आहेत.