पिंपरी – कासारवाडी येथील विद्याविकास प्रशालेत आयोजित केलेल्या विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना लेखनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, व मातृभाषेचे संवर्धन व्हावे यासाठी आयोजित केलेल्या या संमेलनात सहावी ते आठवी व नववी ते दहावी असे दोन गट केले होते. या संमेलनामध्ये शहरातील सहभागी झालेल्या १३ शाळेतील ३२ विद्यार्थी सहभागी होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून साने गुरुजी संस्कार साधना पुणेचे अध्यक्ष डॉ. दिलीप गरुड, विद्यार्थी विकास मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, संस्थेच्या संचालिका कांचन भोसले, कवयित्री रुपाली अवचरे, कवयित्री साक्षी थोरात, सचिन गटणे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कवी संमेलनात आई-बाबा, निसर्ग, मित्र इत्यादी विविध विषयावर कविता सादर केल्या.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
गट क्रमांक एक
आर्या अमोल जाधव (प्रथम क्रमांक) भाग्यश्री शरद जाधव (द्वितीय, दोघेही विद्या विकास प्रशाला), प्रेम संतोष पवार (तृतीय), उमेश कमलेश पटेल (उत्तेजनार्थ, दोघेही माध्यमिक विद्यालय लांडेवाडी)
गट क्रमांक दोन
स्वराज रामकृष्ण भोसले (प्रथम क्रमांक, विद्या विकास प्रशाला), मधुरा मारुती काटमारे (द्वितीय, श्रमजीवी प्राथमिक विद्यालय), आदिती संदीप उदगिरे (तृतीय, जिजामाता प्राथमिक विद्यालय), दिव्या संदीप चव्हाण (उत्तेजनार्थ, पु. वा. परांजपे आश्रम शाळा तळवडे)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनिषा वेठेकर यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती लांडगे यांनी केले. तर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका धनश्री साळूंखे यांनी आभार मानले.