नवी दिल्ली – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचे मोठे वक्तव्य आले आहे. गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसऱ्या नेत्याला संधी मिळावी, असे ते म्हणाले. त्यांनी पक्षनेतृत्वावर निशाणा साधला त्यांना पराभवाची कारणे माहीत नसतील तर ते कल्पनेत जगत असल्याचे ही ते म्हणाले आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले आहे.
सिब्बल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाचे आपल्याला आश्चर्य वाटले नाही. ते म्हणाले, “सीडब्ल्यूसीच्या बाहेरही काँग्रेस आहे… कृपया त्यांचे मत ऐका… आमच्यासारखे अनेक नेते आहेत जे सीडब्ल्यूसीमध्ये नाहीत, परंतु काँग्रेसचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे. आम्ही CWC मध्ये नसल्यामुळे आम्हाला काही फरक पडतो का? आम्हाला काही फरक पडत नाही कारण आम्ही सीडब्ल्यूसी मध्ये नाही? देशभरात अनेक काँग्रेसजन आहेत. केरळमधून, आसाममधून, जम्मू-काश्मीरमधून, महाराष्ट्रातून, उत्तर प्रदेशातून, गुजरातमधून, जे हा दृष्टिकोन मानत नाहीत.