बारामती, (प्रतिनिधी)- कृषक भारती को-ऑपरेटिव्ह महाराष्ट्र पुणे यांचे वतीने गुणवडी (ता. बारामती) येथे शेतकरी मेळावा झाला. याप्रसंगी कृभको या संस्थेच्या प्रचारक रथाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून माळेगाव कारखान्याचे माजी संचालक ॲड. गुलाबराव गावडे हे होते. श्री दत्त विकासचे चेअरमन भारत गावडे पाटील यांनी स्वागत केले. कृभकोचे निखिल जांभुळकर म्हणाले की, संस्थेच्या खताबाबत व देशात शेतकऱ्यांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करीत असून एकूण झालेल्या नफ्यापैकी 20 टक्के नफा संस्थेच्या सभासदांना देण्यात आला आहे, असे सांगितले.
गुलाबराव गावडे, माळेगाव कारखानाचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकासाधिकारी प्रवीण कांबळे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गुणवडी गावचे प्रगतशील शेतकरी तानाजीराव काटे यांनी 86032 ऊस वाणाचे एकरी 128 टन उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गुणवडी ग्रामपंचायत सरपंच प्राची रवींद्र घोडे, उपसरपंच ऋषिकेश फाळके, तुकाराम गावडे, बंटी पिसाळ, मारुती गावडे, नवनाथ गावडे, सुकुमार गावडे, भोलेनाथ हारे, शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदेश गावडे यांनी केले श्री छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी आभार मानले.