मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीतील या हिसेंत आतापर्यंत एका शेतकऱ्याचा जीव गेले आहे. यावर अभिनेत्री आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना रनौत हिची प्रतिक्रिया आली आहे.
याआधी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगनाने संताप व्यक्त केला आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आवाहन कंगनाने केले आहे. तिच्या या आवाहनामुळे शेतकरी आंदोलन आणखी चिघळू शकते. मात्र कंगनाकडून सतत बेजबाबदारपणे वक्तव्य करण्यात येत आहे. “युपी पोलीस लठ्ठ बजाओ” असा हॅशटॅग कंगनाने वापरला आहे. या व्यतिरिक्त कंगनाने आपल्या मनातीत खदखद बोलून दाखवली.
Sick and tired of riots and blood bath almost every month , Delhi, Bangalore and now again Delhi #दिल्ली_पुलिस_लठ_बजाओ #RedFort pic.twitter.com/pWhXtOrqkx
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 26, 2021
कंगना आणखी एका ट्विटमध्ये म्हणते की, मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले तेव्हा सहा कंपन्यांनी मला ब्रँड ऐम्बेसेडर बनविण्यास नकार दिला. आता मी म्हणते की, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारा प्रत्येक भारतीय नागरिक अतिरेकी आहे, असंही कंगनाने म्हटले आहे. यावेळी कंगनाने त्या सहा ब्रँडला देखील फटकारले.
Six brands cancelled contracts with me some were already signed some were closing n said I called Farmer terrorists so they can’t have me as an ambassador. Today I want to say each and every Indian who is supporting these riots is also a terrorist including anti national brands. https://t.co/JVzLO4hqEU
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 26, 2021