जांबुत – गावच्या सर्वांगीण विकासासाठी उद्याचे शिल्पकार घडविण्याची गरज असून विविध माध्यमातून निधी प्राप्त करून गावचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,असे मत पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी व्यक्त केले.
पिंपरखेड (ता.शिरूर) येथील श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
या ठिकाणी इयत्ता पाचवी ते बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार (दि.९) रोजी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
इयत्ता पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि आकरावी ते बारावी अशा एकूण तीन गटांमधून “ माझ्या स्वप्नातील गाव” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांना चषक, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून स्पर्धा संपन्न झाल्याची माहिती उपसरपंच विकास वरे यांनी दिली.
यावेळी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामदास बर्हाटे , सरपंच राजेंद्र दाभाडे विद्यालयाचे प्राचार्य बी.एल. कोठावळे, मुख्याध्यापक पी.सी. बारहाते, प्राध्यापक रामदास मगर, हनुमंत तुपेरे, प्रशांत पंचरास, शामकांत चौधरी, दत्तात्रय सोनार, उपशिक्षक प्रवीण गायकवाड, सुभाष कोरडे, बाळू बांबळे आदि उपस्थित होते