मुंबई – शरद पवारांचा सर्वात विश्वासू साथीदार आणि पवारांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा माणूस प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले की,’वळसे-पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. शरद पवारांचा सर्वात विश्वासू साथीदार आणि शरद पवारांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. शरद पवारांच्या नजरेनं या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याच आश्चर्य वाटते. त्यांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजुच्या मतदार संघात आमदार निवडून आणू शकले नाही.’ असेही ते म्हणाले आहे
तत्पूर्वी,जित पवार गटातील नेते दिलीप वळसे पाटील यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली केली आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील नेत्यांचे आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. यातच आता दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘जनतेने एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केले नाही,’ असे वळसे पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.