रहिमतपूर -मणिपूर येथे देशसेवा करताना निधन झालेले आर्वी (ता. रहिमतपूर) येथील जवान अक्षय यादव यांच्यावर गावातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलवडे, जिल्हा परिषद सदस्य भीमरावकाका पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरपंच सविता राऊत, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले विकास राऊत, सपोनि घनश्याम बल्लाळ, सचिन राठोड, पत्रकार अविनाश कदम, ग्रामविकास अधिकारी विजय ढाणे, मुख्याध्यापक कुंभार, लष्करी अधिकारी बी. एस. काशीद, कॅप्टन मोरे, कॅप्टन दिनकर निकम, कॅप्टन हणमंत निकम, सुभेदार मेजर चंद्रकांत पवार, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सुभेदार मेजर वाल्मिक वैरागडे आदींनी श्रद्धांजली वाहिली.