सासवड – राज्यातील शेतकऱ्यांसाठी जय किसान कंपनीच्या 24.24.00 संपन्ना या नवीन खताची सिरीज सुरू झाली आहे. पुरंदर तालुक्यामध्ये ही खते उपलब्ध झाली आहेत. या संदर्भातील जय किसान कंपनीचे अधिकारी कर्मचारी व पुरंदर तालुक्यातील नवनियुक्त डिस्ट्रीब्युटर्स यांनी आपल्या खताचा साठा उपलब्ध करून दिला असल्याचे दिवे येथील हरे कृष्ण कृषी सेवा केंद्राचे नितीन जाधव यांनी सांगितले.
या खताचे फायदे काय? पिकाच्या पोषणात ते कशी मदत करते?
नायट्रोजन हे नायट्रेट आणि अमोनॉलिक स्वरूपात असते त्यामुळे पिकासाठी नायट्रोजनची दीर्घ उपलब्धता ते शुद्ध खते असल्यामुळे भेसळ करणे अशक्य आहे. या फॉस्फेटमध्ये जास्त पाणी शोषून ठेवण्याची शक्ती असल्यामुळे जलद वाढण्यास मदत होते. एसिडिक प्रकृति असल्यामुळे मातीची पीएच सुधारते.
विशेषतः अल्कधर्मी भागातील सर्व अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया पिके, फळ पिके व भाजीपाला पिकाला त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो?
उत्कृष्ट मुळांचा आणि कोबांचा विकास. दुष्काळाचा सामना करून पिक येण्यास सक्षम करतो. पीक जास्त वेळ हिरवे राहतात. पीक उत्पादन आणि पिकाच्या सुधारित गुणवत्तेचे प्रमाण. यामध्ये नायट्रोजन (एन) आणि फॉस्फरस (पी) ही पोषकतत्वे असतात.
यावेळी एनपीके मॅनेजर अनुज सिंग, मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर किरण पवार, विपणन अधिकारी अमित खांडे, बारामतीचे जय किसान सल्लागार प्रतीक जगदाळे, दिवे येथील हरे कृष्ण कृषी सेवा केंद्र सासवडचे विकास ऍग्रो एजन्सी भुवैभव, मांजरी उपस्थित होते.