लखनौ – एबीपी न्यूजने सी वोटरच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणानंतर उत्तर प्रदेशात जोरदार दावेबाजी सुरू झाली आहे. आता कॉंग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी यांनी बहुजन समाज पक्षाच्या संदर्भात टिप्पणी केली आहे. त्यांनी बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि इंडियाचा पंतप्रधान पदाचा चेहरा याबाबतही भाष्य केले आहे.
बसपला आघाडीत सहभागी करून घेण्याच्या संदर्भात प्रतापगढी म्हणाले की, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना वाचवायची आहे त्यांनी आघाडीत सहभागी झाले पाहिजे. काल सर्वेक्षणातून जी आकडेवारी समोर आली आहे ती पाहता मायावती नव्याने विचार करतील. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील पक्षांसोबत आले पाहिजे. दोनदा त्यांचे सरकार आले, मात्र आता पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही.
मायावती यांनी आघाडीसोबत यायला हवे. किमान सर्वेक्षण पाहिल्यावर तरी त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा. अर्थात त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे असे प्रतापगढी यांनी नमूद केले. दरम्यान, संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी यांनी दावा केला की बिहारच्या जनतेने नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब केल्याचे सिध्द होते आहे.
कारण बिहारमध्ये आघाडीला भाजपवर बढत मिळताना दिसून येते आहे. जोपर्यंत आर्थिक- सामाजिक प्रश्नांवर कटीबध्दता व्यक्त केली जात नाही तोपर्यंत चांगले निष्कर्ष निघणार नाहीत असेही त्यांनी नमूद केले.