नवी दिल्ली : वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी तोगडिया बोलत होते. यावेळी तोगडिया यांनी नरेंद्र मोदी भेटत नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी देशाची आर्थिक परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि झपाट्याने होत चाललेलं खाजगीकरण या मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
ते म्हणाले,’ मोदी सरकारचं आर्थिक धोरण जॉबलेस असल्याची टिप्पणी करत मोदींजींची आर्थिक धोरणं काही कामाची नसल्याची टीका त्यांनी केली.खाजगीकरणावरुन तोगडिया यांनी नरेंद्र मोदींना चांगलेच चिमटे काढले. देशात झपाट्याने होत चाललेलं खाजगीकरण माझ्या समजण्यापलीकडचं असल्याचं सांगत नरेंद्र भाई मेरे अच्छे दोस्त थे, पर अभी बिगड गये, असं तोगडिया म्हणाले.’
दरम्यान,भारताचा किंवा जगातला कोणताही व्यापारी फायद्यासाठी काम करतो यात दुमत नाही. पण हा नफा कोणाकडून कमावतो हा प्रश्न आहे. जेवढ्या सरकारी संस्था या खासगीकरणात जाणार तेवढे पाच टक्के जास्त पैसे जनतेला चुकवावे लागणार आहेत. रोड, रेल्वेस्टेशन, स्टेडियम हे खाजगी लोकांना देणं हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. या संस्था खासगी संस्थांना देणे म्हणजे देशाच्या जनतेला लुटणे असेच आहे, असे ते म्हणाले.