Cyber Crime | देशातील सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ऑनलाइन फसवणुकीत मोबाइल सिमचा वापर रोखण्यासाठी, टेलिकॉम ऑपरेटर देशभरातील सुमारे 18 लाख मोबाइल कनेक्शन बंद करणार आहेत. विविध कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडून सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक प्रकरणांच्या तपासात या मोबाईल क्रमांकांचा सहभाग समोर आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी अशा संशयास्पद सिमची या आधीच तपासणी केली होती. या सिमकार्डच्या मदतीने अनेक प्रकारचे आर्थिक गुन्हे केले जात असल्याचे आढळून आले आहे. एका मोबाईलमध्ये हजारो सिमकार्ड वापरले Cyber Crime | तपासादरम्यान अशा प्रत्येक मोबाईलमध्ये हजारो सिमकार्ड वापरले जात असल्याचे आढळून आले. याशिवाय ते एकाच मोबाईलमध्ये एक सिम जास्त काळ वापरत नाहीत. स्वतःचे रक्षण करण्यासाठी, फसवणूक करणारे फक्त काही आउटगोइंग कॉल करतात आणि नंतर सिम बदलतात. दूरसंचार विभागाने 9 मे रोजी कंपन्यांना आदेश दिले होते की, 28,220 मोबाईल फोन आणि सुमारे 20 लाख सिमकार्डचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यापैकी 18 लाख सिम आणि हजारो मोबाईल फोन प्रभावित होणार असल्याचे मानले जात आहे. मोबाईल फोन आणि सिमकार्डच्या मदतीने अलीकडच्या काळात अनेक मोठे आर्थिक गुन्हे घडले आहेत. ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, साधारणपणे संशयास्पद सिम्सच्या बाबतीत, फक्त 10 टक्के कनेक्शनची पडताळणी केली जाते आणि बाकीचे डिस्कनेक्ट केले जातात. जेव्हा टेलिकॉम कंपन्या 15 दिवसांच्या आत पुन्हा पडताळणी करतात आणि सिमची पडताळणी होत नाही, तेव्हा कनेक्शन डिस्कनेक्ट केले जाते. Cyber Crime | ज्या 20 लाख सिमची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यापैकी बहुतांश सिम चुकीच्या कारणांसाठी वापरल्या जातील आणि त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तीकडून त्यांची पडताळणी होणार नाही, अशी भीती दूरसंचार विभागाकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी सुमारे दोन लाखांहून सिम ब्लॉक दूरसंचार कंपन्यांनी सायबर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षी सुमारे दोन लाखांहून सिम ब्लॉक केले होते. हरियाणातील मेवातमध्ये सरकारने सखोल तपास करून एकाच वेळी 37 हजारांहून अधिक सिमकार्ड बंद केले होते. हेही वाचा: ‘400 पारची चर्चा झाली तर काँग्रेस-आपला चक्कर येऊ लागते…’ योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल