नवी दिल्ली: भारताने ‘बेकायदा कारवाया प्रतिबंध’ कायद्याअंतर्गत जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर, लश्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व झकी-उर-रहमान लखवी यांना मोठा झटका दिला आहे. या कायद्याअंतर्गत भारताने यांना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. तसेच या सर्वांविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे.
मसूद अजहर आणि हाफिज सईद या दोघांना संयुक्त राष्ट्राने ग्लोबल दहशतवादी म्हणून याआधीच जाहीर केलेले आहे.
Masood Azhar, Hafiz Saeed, Dawood Ibrahim,Zaki-ur-Rehman Lakhvi declared terrorists under the amended Unlawful Activities (Prevention) Act pic.twitter.com/yXzV6NxL2c
— ANI (@ANI) September 4, 2019
भारताने दहशतवादाविरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. काल भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळून देशात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. पाकिस्तानचे दोन दहशतवादी जम्मूत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते त्याच दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी या दोन्ही दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे. तसेच या दोन्ही दहशतवाद्यांकडून सध्या कसून चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कलम 370 रद्द केल्यानंतर देशात 300 ते 350 दहशतवादी देशात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार जम्मू-काश्मीरसह देशात अनेक ठिकाणी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.