श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कव्हर फायरींगच्या सहाय्याने भारतात घुसलेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक लष्करी अधिकारी धारातीर्थी पडला तर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन नागरिक जखमी झाले. या घटना मंगळवारी (दि.22) घडल्या.
नृाशेरा भाकातील कलाल पट्ट्यात सीमेजवळ काही संशयास्पद हालचाली दिसल्या. तेथे गस्ती पथक पोहोचताच चकमक उडाली. त्यात एक लषकराचा अधिकारी गोळ्या लागून जखमी झाला. त्यातच ते शहीद झाले. त्या भागातूण शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा ही चकमक सुरू होती., अशी माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिली.
त्यापुर्वी पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या तोफगोळ्यांच्या अंधाधूंद माऱ्यात एका महिलेसह दोन नागरिक मरण पावले. दुपारी दीडच्या सुमारास हा तोफगोळ्यांचा मारा सुरू झाला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले.
दोन दिवसांपुर्वी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तीन तळ लष्कराने तोफांच्या माऱ्यात उद्ध्वस्त केले होते. त्यात पाकिस्तानचे 10 सैनिक आणि 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.