नवी दिल्ली: चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळल्याचे वृत्त आज इराणने फेटाळले. या वृत्तामागे काही स्वार्थ हेतू असावेत, असेही इराणने म्हटले आहे.
भारताचे राजदूत गड्डम धर्मेंद्र यांना इराणचे रेल्वे मंत्री सईद रसौली यांनी निमंत्रित केले. दोघांनी चाबहार -झहेदान रेल्वेच्या सहकार्याचा आढावा घेतला.
रसौली म्हणाले, चाबहार -झहेदान रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळल्याच्या बातम्या देण्यामागे काही स्वार्थी हेतू आहेत, असे भारतीय दुतावासाने सांगितले. इराण सरकारने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यात प्रकाशित झाल्या होत्या. त्याचे खंडन करण्यात आले आहे.