IND Vs ENG Test Series : इंग्लंड 5 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. यावेळीही इंग्लिश खेळाडूंना भारतीय खेळपट्ट्यांवर बेझबॉल क्रिकेटची रणनीती दाखवायची होती. मात्र, त्याची रणनीती त्याच्यावर उलटली. रोहित शर्मा आणि कंपनीसमोर बेन स्टोक्स अँड कंपनी पूर्णपणे अपयशी ठरली आणि 4 पैकी 3 सामने गमावून मालिकाही गमावली आहे. पण भारतात बेझबॉल रणनीती अयशस्वी होण्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? आणि इंग्लंडचे फलंदाज चांगली कामगिरी का करू शकत नाहीत? तर हेच आपण जाणून घेऊया….
पहिला सामना जिंकल्यानंतर पाहुणा संघ झाला गर्विष्ठ…
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमपासून ही मालिका सुरू झाली. जिथे पहिल्या डावात भक्कम धावसंख्या उभारूनही भारताला 28 धावांनी पराभव पत्करावा लागला. हा सामना भारत हरू शकतो यावर एकाही भारतीय चाहत्याचा विश्वास बसत नव्हता. मात्र, या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी खराब फलंदाजी केली आणि इंग्लिश खेळाडूंनी शानदार गोलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले. हा सामना जिंकल्यानंतर इंग्लिश संघाचे तारे शिगेला पोहोचले होते. पण, कॅप्टन रोहितला त्याच्याच घरात कोणीतरी अशा प्रकारे पराभूत करावं हे त्याला मान्य नव्हतं.
टीम इंडियाने उर्वरित सामन्यांमध्ये शानदार पुनरागमन केले आणि इंग्लंड संघ सलग तीन सामने हरला. पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ इतका गर्विष्ठ झाला की त्यांना ही मालिका आपणच जिंकू असे वाटू लागले होते. याचे परिणाम मात्र त्याना नंतर भोगावे लागले.
पराभवानंतरही खेळाच्या शैलीत केला नाही बदल…
इंग्लंडला सलग दोन सामन्यात पराभूत झाली होती. चौथ्या आणि रांची कसोटीमध्ये इंग्लंडचा संघ आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरला होता. इंग्लंडचा संघ बेझबॉल सोडून रांचीमध्ये सामान्य क्रिकेट खेळेल, असे सर्वांना वाटत होते. पण असे झाले नाही. या सामन्यात जो रूटचे शतक वगळता कोणत्याही खेळाडूला विशेष काही करता आले नाही. पहिल्या डावात गोलंदाजांनी चांगला खेळ केला. पण, जुरेलच्या 95 धावांच्या खेळीपुढे तेही असहाय्य दिसले आणि सामना 5 विकेटने हरले.
मिडल ऑर्डर (मध्यम क्रम) पूर्णपणे ठरली अपयशी…
इंग्लड संघाची ताकद म्हणजे त्याची मधली फळी. या संघाचा एकही फलंदाज मधल्या षटकांमध्ये येऊन संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहचविण्यास अपयशी ठरला. ऑली पोपने पहिल्या सामन्यात नक्कीच अप्रतिम फलंदाजी केली. पण, त्यालाही पुढच्या सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही. चौथ्या सामन्यातील जो रूटचे शतक सोडले तर तोही इतरवेळी फ्लॉप ठरला. याशिवाय बेन स्टोक्स, बेन फोक्स, डकैट आणि क्रॉली यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. त्यामुळे बेझबॉल रणनीती भारतीय मैदानावर खूप फ्लॉप ठरली. त्याचबरोबर भारतीय फिरकीपटूंसमोर इंग्लंडची प्रत्येक रणनीती पूर्णपणे बॅकफूटवर असल्याचे दिसून आले.