नवी दिल्ली – प्रत्यक्ष कर मंडळाने गेल्या काही वर्षात कर क्षेत्रात बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. कर संकलन करण्याची यंत्रणा आधुनिक करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर विभाग व करदात्यादरम्यानचा विश्वास वाढला आहे. त्यामुळेच या वर्षी विक्रमी कर संकलन झाले असल्याचा दावा प्रत्यक्ष कर विभागाचे अध्यक्ष जे बी मोहपात्रा यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की आतापर्यंत च्या आकडेवारीनुसार तब्बल 13.63 लाख कोटी रुपयाचे कर संकलन झाले आहेत.
करुणा मुळे अर्थव्यवस्थेवर बराच परिणाम झाला आहे अशा अफवा पसरलेल्या आहेत मात्र प्रत्यक्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था उत्तम रीतीने काम करीत आहे कंपन्यांनी यावर्षी दिलेला कर वाढला आहे असे त्याने सांगितले आगामी काळामध्ये परिस्थिती आणखी सुधारण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
यावर्षी कर संकलन वाढले असल्यामुळे पुढील वर्षी प्रत्यक्ष करातून 14.20 लाख कोटी रुपये उभे राहतील असे अर्थसंकल्पामध्ये ठरविण्यात आले आहे. हे उद्दिष्ट सहज साध्य होईल असे त्यांना वाटते. अर्थमंत्रालय याबरोबरच प्रत्यक्ष कर मंडळ करदात्यांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने काम करीत आहे. त्याचबरोबर व्यापक प्रमाणात नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे कर चुकवेगिरी कमी होत आहे. त्याच बरोबर कर संकलन नाही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.