रविशंकर प्रसाद दुसऱ्या एनआयसी टेककॉन्लेव्ह 2020 चे प्रसाद यांनी केले उद्घाटन
नवी दिल्ली : जीवन सोपे आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाची रचना केली पाहिजे, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) आयोजित दुसऱ्या एनआयसी टेककॉन्क्लेव्ह 2020 चे उद्घाटन करताना बोलत होते.
तंत्रज्ञान क्षेत्रातल्या व्यक्तींनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती वास्तवात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत. तंत्रज्ञान कमी किमतीचे, विकासात्मक आणि सर्वसमावेशक असावे. डिजिटल इंडिया म्हणजे बुद्धिमान वर्गाकडून सर्वसामान्यांसाठी तंत्रज्ञान. डिजिटल दरी भरून काढण्यासाठी डिजिटल इंडिया उपक्रम आहे, असे ते म्हणाले.
भारत वित्तीय समावेशनाच्या मोठ्या क्रांतीच्या प्रतीक्षेत आहे असे त्यांनी सांगितले. डिजिटल समावेश आणि वित्तीय समावेशन हा भारताच्या परिवर्तनवादी कारभाराचा मापदंड बनला पाहिजे, असे प्रसाद यांनी सांगितले. डेटा रिफाइनिंग प्रक्रियेचे मोठे केंद्र भारत झाला पाहिजे आणि एनआयसीने त्या दिशेने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.