करंजगाव, दि. 7 (वार्ताहर)- भात पिकाचे आगार म्हणून ओळख असलेल्या मावळ तालुक्यात भात पीक जोमात आले असून, भात पिकांना लोंब्या लगडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मावळ तालुक्यातील पवन, आंदर व नाणे भागातभात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या भागातील भात खाचरांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी उपलब्ध होत असल्याने परिसरातील शेतकरी खरिप हंगामात मुख्य पीक म्हणून भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. सध्या परिसरातील भात पीक जोमात आले असून भात पिकांच्या लोंब्या भरण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानतर पाऊस झाल्याने पिके जोमात आहेत.
नाणे मावळात पावसाच्या हलक्या सरी का असेना पण दिवसातून दोन-तीन वेळा पडत असल्याने भातपीकाच्या वाढीकरिता त्या पूरक ठरत आहेत. नवरात्र व दसरा झाला असून, काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. शेतकऱ्यांची सुगीची तयारी सुरू झाली आहे.