रायपुर – छत्तीसगड मध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांना आत्ता तीन लाखांऐवजी 20 लाख रूपयांची मदत दिली जाणार आहे. त्यासंबंधातील आदेश आज जारी करण्यात आला.
मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांनी स्वता लक्ष घालून हा निर्णय घेतला आहे. छत्तीसगडचा बराच भाग नक्षलग्रस्त असून तेथे सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये अनेक वेळा चकमकी होतात. त्यात सुरक्षा जवान शहीद होण्याचे प्रमाणही मोठे असते. त्यांच्या पश्च्यात त्यांच्या कुटुंबाचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत ही घसघशीत वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षातील पहिल्या दोन महिन्यातच 25 सुरक्षा जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगड मध्ये नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलापुढील आव्हान मोठे आहे.