इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 15 दिवसांसाठी सुटका करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने अल-कादिर ट्रस्टच्या गैरव्यवहार प्रकरणात अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीटीआयचे प्रमुख इम्रान यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी इम्रानच्या जामीन अर्जावर आज इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यादरम्यान पाकिस्तानमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.
दरम्यान, पीटीआयच्या आंदोलकांनी देशातील शहीद जवानांचा अपमान केल्याचे पीएम शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. “आमच्या शत्रूंनी” देखील हे केले नाही. लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले करणे यापेक्षा मोठा दहशतवाद देशात असू शकत नाही. आणि हे सर्व पाहून एक देश (भारत), ज्याचे नाव मला घ्यायचे नाही, तो आनंद साजरा करत होता की, जे 75 वर्षात होऊ शकले नाही ते आता पाकिस्तानमध्ये घडत आहे.
एका दिवसापूर्वी पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना सुप्रीम कोर्टाने दिलेला “आराम” यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान शेहबाज शरीफ म्हणाले की “अशा दुटप्पी मानकांमुळे पाकिस्तानातील न्याय संपुष्टात येत आहे”. फेडरल कॅबिनेटला संबोधित करताना, त्यांनी पीएमएल-एन सुप्रीमो नवाझ शरीफ आणि फेडरल आघाडीच्या इतर सदस्यांच्या अटकेची आठवण करून दिली आणि त्यांच्याशी अशी उदारता का दाखवली गेली नाही असा सवाल केला. नवाझ शरीफ यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल कोणीही बोलले नाही, असे ते म्हणाले.
पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी पीटीआयच्या कार्यकाळात पीएमएल-एन आणि त्यांच्या नेत्यांच्या “राजकीय छळ” दरम्यान न्यायालयाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी विचारले, “आम्हाला तुरुंगात पाठवले जात असताना न्यायालयांनी कधी लक्ष दिले होते का?
देश कठीण काळातून जात आहे… – शाहबाज
पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, देश अत्यंत कठीण काळातून जात आहे. देश अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. इम्रान खान यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. वर्ष 1973 मध्ये ढाका पडल्यानंतरही असे दृश्य पाहिले नव्हते, ते आज इम्रान खान यांच्या अटकेनंतर पहायला मिळते आहे. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या मृत्यूनंतरही निदर्शने उफाळून आली होती, परंतु कोणीही “लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले केले नव्हते.