मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी कोणीही राजकारण करू नये. राज्यातील जनतेने आतापर्यंत धैर्य दाखवला आहे. देशालाच नव्हे तर जगाला दिशा दाखवण्याचा आपल्या राज्याचा इतिहास आहे. जागतिक संकटातही आपल्याला हीच भूमिका पार पाडायची आहे, असे सांगितले. मात्र भाजप नेते निलेश राणे यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
राणे म्हणाले, मुख्यमंत्री परत परत सांगतायत राजकारण करू नका. कोण करतंय राजकारण?, सगळ्या पक्षातले लोकं आपआपल्या परीने मदत करतायत. कोण दाखऊन करत आहेत तर कोण न दाखवता. पण जर धान्य मिळत नसेल, राज्यात रुग्ण वाढत असतील, सरकारी कामात नियोजन दिसत नसेल तर सरकारला प्रश्न विचारले जाणारचं.
यापूर्वी देखील निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. . ‘मुख्यमंत्री पद काँग्रेसमुळे, आमदारकी राज्यपालाकडून, पक्ष वडलांचा… ह्या माणसाचं स्वतःच काहीच नाही’ अशी टीका त्यांनी केली होती.
मुख्यमंत्री परत परत सांगतायत राजकारण करू नका. कोण करतंय राजकारण???, सगळ्या पक्षातले लोकं आपआपल्या परीने मदत करतायत. कोण दाखऊन करत आहेत तर कोण न दाखवता. पण जर धान्य मिळत नसेल, राज्यात रुग्ण वाढत असतील, सरकारी कामात नियोजन दिसत नसेल तर सरकारला प्रश्न विचारले जाणारचं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 12, 2020