औंध -सध्या लग्नसराईत बहुतेक ठिकाणी लग्न वेळेत लावले जात नाही. हा अनुभव आपल्या प्रत्येकाला अनेकदा येतो. मुहूर्ताची वेळ लक्षात ठेऊन नातेवाईक व मित्रपरिवार लग्नाला येत असतात. मात्र, वधु-वर पक्षाकडून वेळ चुकवली जाते. अगदी दोन-तीन तासही पाहुणे मंडळी ताटकळत असतात. यातून सगळ्यांचीच गैरसोय होते. अनेकदा महत्त्वाचे पाहुणे वेळेत आले नाहीत म्हणूनही मुहूर्त लांबतो, याचा त्रास मंगलकार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही होतो. कारण, दुसऱ्या दिवशीही त्याच मंगल कार्यालयात लग्न सोहळा होणार असतो, यासाठीची साफसफाई, सजावट, जेवणाचे काही पदार्थ अशा कामांचे नियोजन असते. याचा विचार करून लग्नाचा मुहूर्त पाळण्याचे वधु-वर पक्षाने ठरवले पाहिजे.
यासाठीच सूस रोड येथील सनीज ्वर्ल्ड मंगल कार्यालयाने राबविलेल्या अनोख्या योजनेचे वऱ्हाडी मंडळींकडून स्वागत होत आहे.
मुहूर्तावरील वेळेत लग्न लावल्यास रोख 25,555 रुपयांचे बक्षीस वधु-वर पक्षास देण्यात येणार आहेत. उपस्थितांच्या वेळेचा सन्मान म्हणून ही योजना आहे, अद्याप तरी असे बक्षिस कोणी जिंकले नसल्याचे कार्यालयाचे मालक सनी निम्हण यांनी सांगितले.