मुंबई – कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला होता. त्यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू केल्या गेल्या नाही. यादरम्यान, लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून होते.
मात्र, आता हळूहळू सर्व अनलॉक करताना दिसत आहेत. तसेच राज्य सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत.
हे सर्व नियम लक्षात घेऊन आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोचे चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. पुन्हा मालिकेचे चित्रीकरण सुरु झाल्यामुळे सर्वजण आनंदी असल्याचे पाहायला मिळते. मालिकेतील जेठालाल हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांनी एका मुलाखतमीध्ये बच्चन सरांना करोनाचा संसर्ग होऊ शकतो तर इतर कोणालाही होऊ शकतो असे म्हटले आहे.