मुंबई – एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांचे चक्र फिरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने धाड टाकली आहे. त्यांच्या सोबतच सीबीआयने आर्यन खान क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने त्यांच्या मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधील एकूण 29 ठिकाणी छापेमारी केली.एवढेच नाही तर सीबीआय कडून त्यांची तब्बल १२ तास चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत समीर वानखेडेने माध्यमांशी बोलतांना सांगितले की,’सापडलेल्या मालमत्तेची कागदपत्रे मी नोकरीत रुजू होण्यापूर्वीची आहे, मी देशभक्त असल्याची शिक्षा भोगत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
समीर वानखेडे पुढे म्हणाले की, ‘सीबीआयने त्यांच्या सासरच्या घरावरही छापा टाकला आहे जेथे 7 सीबीआय अधिकारी उपस्थित होते. याशिवाय सीबीआयच्या 6 अधिकाऱ्यांनी माझ्या वडिलांच्या अंधेरी येथील घरावर छापा टाकला, तेथेही त्यांना काहीही मिळाले नाही.’
आर्यन खान प्रकरणात 25 कोटी रुपयांची कथित मागणी
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकवू नये म्हणून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने समीर वानखेडेसह 4 जणांवर गुन्हा दाखल केला होता. एजन्सीने समीर वानखेडेच्या मुंबईतील घरासह दिल्ली, रांची आणि कानपूरमध्ये एकूण 29 ठिकाणी छापे टाकले आहेत.