पाचगणी – शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टर मध्ये फिरू नये असा काय कायदा आहे काय ? मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. वेळेची बचत व्हावी म्हणून सरकारी हेलिकॉप्टरने शेतात जातो तिथे अधिकारी, पदाधिकारी , शेतकरी यांचेशी संवाद साधून प्रश्न सोडवतो. मी मुख्यमंत्री झालो म्हणून माझ्या डोक्यात कसली हवा जाऊ दिली नाही.
माझे पाय नेहमी जमिनीवर असतात आणि ती आपोआप शेतीकडे वळतात. त्यामुळे कुणी कितीही टीका टीपणी करुद्यात हेलिकॉप्टर मध्ये जाऊन फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली काय वाईट आहे का असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांचे नाव घेता लगावला.
पांचगणी येथील एम् आर ए सेंटरच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘ स्ट्रॉबेरी विथ सी एम.’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील, भूषण गगरानी, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख,
जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, विकास शिंदे, मुख्याधिकारी निखिल जाधव, प्रवीण भिलारे, संजय गायकवाड, गणपत पार्टे, किसन शेठ भिलारे, नितीन दादा भिलारे, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, महेश रसाळ, तसेच स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
वसंतदादा पाटील यांचे नंतर थेट शेतकरी व सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी काय सांगाल यावे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वसामान्यांची दुःख , अडचणी, समस्या, त्रास मी जवळून पहिल्या आहेत. मी बघतो करतो हे माझ्या डिक्शनरीत नाही.
मी मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात कसली हवा नाही. मी मुख्यमंत्री नाही तर कॉमन मॅन समजतो. लोकांना भेटणे हा माझा छंद आहे. घरात, मंत्रालयात बसून मी फेस बुक लाईव्ह करीत नाही लोकांना थेट फेस करतो. शेतकऱ्यांच्या बांधावर जातो शेतावर जातो असे सांगितले.
आमच्या गावची नव्हे तर सातारा जिल्ह्याची पाणी , हवा व पर्यावरण शुद्ध आहे. सातारा जिल्ह्यात राजकीय प्रदूषण ही इकडे नाही. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी एक नंबरच आहे. येथील मुले नोकरी धंद्यासाठी मुंबईला जातात ती गावाला पुन्हा आली पाहिजेत आधुनिक पद्धतीने शेती करून या मुलांनी आर्थिक सक्षम व्हावे. असा सांगून स्ट्रॉबेरीचा रंग की चव आवडते यावर अहो स्ट्रॉबेरीचे सर्वच आवडते असे सांगितले.
शेतकरी व शेती अडचणीत आल्याबाबत विचारले असता आपल शेतकऱ्यांचे सरकार आहे. अवकाळी , गारपीट, हवामान यामुळे होणाऱ्या नुकसानीस आपण भरपाई दुप्पट केली आहे. शेतकऱ्यांना वर्षाला केंद्रातून ६००० दिले जातात आणि आपले राज्य सरकार ६००० रुपये असे बारा हजार रुपये दिले आहेत. आपण शेतकऱ्याना नेहमी मदत करत असतो. बळीराजाला आपण मदत करायची ते करतोय असे सांगितले.
शेती आणि राजकारण यामधील आव्हानांवर विचारले असता त्यांनी सांगितले शेतीमध्ये मोठी आव्हाने आहेत. अवकाळी, गारपीट, ग्लोबल वॉर्मिग यामुळे शेतकरी अडचणीत येतो आहे. यासाठी झाडे लावली पाहिजेत पर्यावरण वाचवले पाहिजे. राजकीय आव्हान आली की आम्ही घेतो शिंगावर. दीड पावणे दोन वर्षापूर्वी आले होते काही अंगावर पण घेतल आम्ही शिंगावर सातारा जिल्हा धाडसी आहे. असे शेवटी सांगितले.
मुख्यमंत्री यांच्या आजच्या धावपळीच्या दौऱ्यात स्ट्रॉबेरी विथ सी एम या कार्यक्रमाअंतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील अनेक ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या समस्यांची निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी एकही निवेदन स्वीकारले नाही त्यामुळे नागरिकांचा मोठा भ्रमनिरास झाला.