सोरतापवाडी -उरुळी कांचन येथे जून महिन्यापासून करोनाची साखळी काही तुटत नसल्याचे दिसुन आले आहे. एकाच दिवसात बारा करोना बाधित रुग्ण आढळले असून आज बाधितांच्या संख्येने शंभरी पार केली. अशी माहिती डॉ. सुचेता कदम यांनी दिली.
रुग्णसंख्या वाढल्याने सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य संतोष कांचन यांनी सरपंच व ग्रामसेवकांवर आरोप केले. सरपंच मनमानी कारभार करत असून महिना झाले तरी सदस्यांची बैठक घेतली जात नाही. करोना नियोजन समितीची बैठक होत नाही. माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर म्हणाले की, या कारभारामुळे लवकरच जिल्हा अधिकारी यांना संपूर्ण बॉडी बरखास्त करून प्रशासक प्रशासक नेमण्याची मागणी करणार आहे.
हे सर्व आरोप फेटाळून लावत सरपंच राजश्री वनारसे यांनी सांगितले की, आम्ही शासनाच्या नियमानुसार कामकाज करत असून, मनमानी होत नाही. जबाबदारी माझी आहे तशीच ती सर्वांची आहे.