अमरावती – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त मुंबईत मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा पठण करावं अन्यथा आम्ही मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असे आव्हानच राणा दाम्पत्याने केले होते.
यानंतर शिवसैनिकांनी राणा कुटुंबियांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. आता आमदार रवी राणा यांनी आपण 22 एप्रिलला मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येणार असल्याचे जाहीर केले आहे. आमदार राणा 500 कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल होतील आणि 23 एप्रिलला हनुमान चालिसा पठण होणार असल्याची माहिती आमदार राणा यांनी दिली आहे.