नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे इतर राज्यात अडकलेल्या प्रवासी, कामगार, विद्यार्थी, भाविक आणि पर्यटकांना नेण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत गाड्यांविषयी अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने रविवारी विशेष गाड्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केला आहेत.
रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे की, विशेष रेल्वे चालविण्यासंदर्भात राज्याने दिलेल्या प्रवाशांच्या संख्येनुसार ट्रेनची तिकिटे छापली जातील. राज्य सरकारच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रवासी तिकीट घेऊ शकतात. प्रवासी तिकिटाचे पैसे स्थानिक अधिकाऱ्याला देता येईल. स्थानिक अधिकारी प्रवाशांकडून आलेले प्रवाशी भाडे रेल्वेला देतील.
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे सांगितले आहे की लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी, कामगार, विद्यार्थी, आणि पर्यटकांना देशब देशभरात प्रवास प्रवास करता येणार आहे. यासाठी या प्रवाशांना स्थानिक प्रशासनाकडे अर्ज करावा लागणार आहे. तसेच प्रवाशांचा तपशील द्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रवाश्साला निर्दिष्ट ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतरच तिकिट दिले जाईल.
प्रवासासाठी दिशानिर्देश
– सर्व प्रवाशांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल.
– रेल्वेने 12 तासापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना रेल्वेतर्फे एक वेळचे जेवण दिले जाईल.
– राज्य सरकारची परवानगी आणि तिकीट मिळाल्यानंतरच रेल्वेमध्ये प्रवास करता येणार. त्यानंतर प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात येईल. स्क्रीनिंग झाल्यानंतरच प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
– प्रशासनाने ठराविक ठिकाणी पोहोचल्यानंतर पुन्हा प्रवाशांची तपासणी करेल.
– रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यात येईल.