नवी दिल्ली – भारतीय वायूदलाच्या आधुनिकीकरण प्रक्रियेअंतर्गत राफेल, अपाचे आणि चिनूक या विमानांच्या समावेशामुळे वायूदल आणखी बलशाली सामरिक शक्ती बनल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.
वायूदलाच्या 88 व्या स्थापना दिनानिमित्त दिलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
देशाचे वायू सैनिक व्यावसायिकता, उत्कृष्टता आणि साहसासाठी ओळखले जातात, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी वायूदल दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
वायूदलाचे धाडसी योद्धे केवळ देशाचे आकाशच सुरक्षित ठेवत नाहीत तर अनेकवेळा मानवतेच्या सेवेमधे अग्रणी भूमिका बजावतात, त्यांचे साहस, पराक्रम आणि समर्पण सर्वांनाच प्रेरित करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.