मुंबई – राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच 2950 सदस्यापदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. 5 नोव्हेंबर 2023 रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. ( gram panchayat elections 2023)
आचारसंहिता लागू –
निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे की, सदर ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून मंगळवार (दि. 3 ऑक्टोबर) आचारसंहिता लागू झाली आहे. 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधित नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी 23 ऑक्टोबरला होईल. 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
25 ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदानाची तारीख 5 नोव्हेंबर असणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. गडचिरोली आणि गोंदिया या भागात सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. तर 7 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.