मुंबई – राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने निकाल आल्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कायम राहणार आहे. मात्र असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षातील प्रक्रियेत राज्यपाल विधानसभा अध्यक्षांचे निर्णय चुकल्यावरुन त्यांना फटकारले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रावरुन राज्यपालांनी कारवाई सुरु करणं चुकचं होतं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. तसेच राज्यपालांनी घेतलेल्या भूमिका कायद्याला धरून नसल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले आहेत. या निर्णयामुळे काही प्रमाणात ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. मात्र 16 आमदारांच्या अपात्रतेच निकाल हा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. तसेच यावर लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे.
यावर आज सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी तातडीची पत्रकार परिषद घेतली यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यपालांवर जहरी टीका केली ते म्हणाले,’महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे. सरकारनं लवकरात लवकर राजीनामा देणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आमची मागणी आहे की राज्यात लवकरात लवकर निवडणुका घ्यायला पाहिजेत आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांची निवड कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हेसुद्धा तपासणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपालांची भूमिका अत्यंत घृणास्पद आहे. राज्यपाल ही संस्था बरखास्त करायला पाहिजे. असे ते म्हणाले. निवडणूक आयुक्त नेमण्याची सुद्धा एक प्रक्रिया पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले,’हे राज्यपाल पूर्वीचे कुठल्या पक्षातील आहे का हे ही बघण्यात यावे. आपल्याकडे पूर्वी असलेले राज्यपाल हे rss चे होते. त्यामुळे त्यांच्याकडून हा उपदव्याप झाला . अशा यंत्रणेचा काहीही फायदा नाही. कारण राज्यपालाची लुडबुड नकोच’ असेही ते म्हणाले आहे.