जळगाव: साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे राज्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवर युरिया खत ब्लॅकने घेण्याची वेळ आली आहे. ज्यादा दराने घ्यावे लागत आहे, पण तेही मिळत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मी कृषिमंत्री असताना अशी वेळ शेतकऱ्यांवर कधीही येऊ दिली नाही, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकार निशाणा साधला. (Eknath Khadse targeted the state government)
खडसे म्हणाले, सरकारचे शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा वेळोवेळी व्हावा, अशी मागणी करताना सरकारचे यावर नियंत्रण राहिलेले नसल्याचा घणाघातही त्यांनी केला. साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. सरकारने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(Eknath Khadse targeted the state government)
मी पाच वर्ष कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई निर्माण झाली नाही. त्यावेळी समन्वय होता. नीटनेटकेपणाने त्यावेळी खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. युरिया खताचे दर हे स्थिर ठेवले. आता मात्र सरकारमधील कोणाचाच समन्वय राहिलेला नाही, असे म्हणत खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.(Eknath Khadse targeted the state government)
दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात ऑक्टोबर 2014 ते जून 2016 या दीड वर्षाच्या कालावधीत एकनाथ खडसे यांनी कृषिमंत्रीपद सांभाळले होते.