मुंबई – राज्यात होणारे 4 ते 5 दिवसांचे हे तोकडं अधिवेशन आहे. पहिला दिवस पुरवणी मागण्यांचा असणार आहे. आमची मागणी होती की अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. मात्र, संसदीय कामकाजात ठाकरे सरकारला रस नाही, अधिवेशन टाळण्याचे प्रयत्न ठाकरे सरकारकडून होतो असल्याचे दिसून येत आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले, 3 दिवस ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन घ्या अशी आमची मागणी आहे. पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर पुन्हा अधिवेशन कालावधी निश्चित करू, असे सांगितले आहे. 2 वर्षांत एकाही अतारांकित प्रश्न, लक्षवेधीला उत्तर दिलेले नाही.